नगर – यंदाच्या पावसाळ्यात राज्यभरात 33 कोटी वृक्षलागवडीचा निर्धार शासनाने केला आहे. हरित महाराष्ट्र करण्यासाठी राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालये, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेण्याचा निर्णय घेत त्यानुसार जिल्हानिहाय वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहेत. राज्यात सर्वाधिक वृक्षलागवड मुंबई उपनगरात सर्वाधिक वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तर सर्वाधिक कमी मुंबई शहरामध्ये झाली आहे. अहमदनगर जिल्हा हा राज्यात सातव्या क्रमांकावर असल्याचे आकडेवारी मध्ये दिसत आहे.
राज्याला 34 कोटी 41 लाख 97 हजार 419 रोपांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात आज अखेर 29 कोटी 74 लाख 93 हजार 11 रोपांची लागवड झाली. एकूण उद्दिष्टाच्या 86.43 टक्के वृक्षलागवड झाली आहे. मुंबई उपनगरात सर्वाधिक 119 टक्के, अकोला जिल्ह्यात 104 टक्के लागवड झाली. वृक्षलागवडीत नगर जिल्हा 7 व्या क्रमाकांवर आहे. मुंबई शहरात सर्वात कमी फक्त 38.34 टक्के लागवड झाली आहे.
मुंबई पाठोपाट अकोला-104 टक्के, नाशिक-100, नंदुरबार 98, धुळे-97, गडचिरोली, कोल्हापूर-96 टक्के, जळगाव-औरंगाबाद -94, नगर 94 टक्के, सिंधुदुर्ग-90, तसेच सोलापूर-55. लातुर-60 टक्के, लागवड करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यासाठी 1 कोटी 17 लाख 63 हजार 850 इतके उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत विभागाला 41 लाख 99 हजार 700, वन विभागाला 41 लाख, समाजिक वनीकरण विभागाला 21 लाख आणि कृषी विभागाला 6 लाख 72 हजार तर नगरविकास विभागाला 1 लाख 88 हजार 750 इतक्या रोपांचे उद्दिष्ट दिले. उर्वरित विभागांना मात्र लाखाच्या आत उद्दिष्ट दिलेले आहे.
जिल्हाभरात 1 कोटी 9 लाख 35 हजार 202 रोपांची लागवड झाली असून, दोन महिन्यांत वृक्षलागवडीचे 94 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम, आदिवासी, उच्च शिक्षण, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, सहकार आणि जीएसटी या विभागांनी दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या तीन महिन्यांत वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. पहिल्या दोन महिन्यांतच जिल्हाभरात 94.50 वृक्षलागवड झाली आहे. मध्य रेल्वेला 1 हजार 250 रोपांचे टार्गेट दिले होते. या विभागाने तब्बल 18 हजार 900 रोपांची लागवड केली. कारागृह विभागाला 500 उद्दिष्ट असताना, या विभागाने 13 हजार 270 रोपांची लागण केली आहे. संरक्षण विभागाला 8 हजार 150 रोपांचे दिले आहेत. या विभागाने दोन महिन्यांत 19 हजार 650 रोपे लावली आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाला 64 हजार 150
टार्गेट असून, या विभागाने शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. आदिवासी विभागाला 10 हजार उद्दिष्ट दिले असून, हे सर्व उहिष्ट त्यांनी शंभर टक्के पूर्ण केले. सामाजिक वनीकरण विभागाने 21 लाख 18 लाख 88 हजार 827 रोपांची लागवड करुन 90 टक्के काम केले आहे. अद्यापि वृक्षलागवडीसाठी एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा अधिक रोपांची लागवड होण्याची शक्यता आहे.