सातारा -शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. राज्य सरकार ज्याप्रमाणे सूचना देईल त्याप्रमाणे शाळा सुरू होतील. ग्रामीण भागातील कमी पटाच्या शाळा सुरु करण्याबाबत जिल्हा परिषदेची भूमिका असून सर्वसहमतीने याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. शहरी भागातील शाळांबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीची सभा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात मंगळवारी झाली. या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, सदस्य अरुण गोरे, शिवरुपराजे खर्डेकर, राजाभाऊ जगदाळे, भावना सोनवलकर, प्रदीप पाटील, रुपेश जाधव यांच्यासह माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा दि. 15 जून रोजी सुरू करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या करोनाचे संकट असल्यामुळे अनेक शाळांमध्ये विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत.
या शाळा ग्राम दक्षता समितीने निर्जंतुकीकरण करून द्याव्यात, शाळा सुरू झाल्यास ग्रामपंचायतींनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना सदस्यांनी मांडली. कमी पटाच्या शाळा सुरू करण्यात अडचणी नसल्या तरी शाळेमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी सूचना सदस्यांनी मांडली. शहरी भागातील शाळा सुरू करणे सध्याच्या परिस्थितीमध्ये अडचणीचे असले तरी शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्वांनी खबरदारी उपाययोजना आखून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत पुढाकार घ्यावा, असा सूरही या सभेतून उमटला.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार आहेत. सातारा तालुक्यात पुस्तके पोच झाली असून लवकरच सगळ्या तालुक्यांत पुस्तके पोच होतील. सद्यपरिस्थितीत शाळांकडून मते मागवण्यात आली आहेत.
ऑनलाइन सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना सदस्यांनी मांडली. कमी पटाच्या शाळा सुरू करण्यात अडचणी नसल्या तरी शाळेमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी सूचना सदस्यांनी मांडली. शहरी भागातील शाळा सुरू करणे सध्याच्या परिस्थितीमध्ये अडचणीचे असले तरी शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्वांनी खबरदारी उपाययोजना आखून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत पुढाकार घ्यावा, असा सूरही या सभेतून उमटला.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार आहेत. सातारा तालुक्यात पुस्तके पोच झाली असून लवकरच सगळ्या तालुक्यांत पुस्तके पोच होतील. सद्यपरिस्थितीत शाळांकडून मते मागवण्यात आली आहेत.ऑनलाइन शिक्षण पद्धती असावी, दोन टप्प्यांत शाळा भराव्यात, अशाही सूचना येत आहेत. सर्व सूचनांचा अभ्यास करून शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय होईल, अशी माहिती मानसिंगराव जगदाळे यांनी दिली.