वाडा येथे अतुल देशमुख यांनी आमदार गोरे यांचे नाव न घेता केला घणाघात
वाडा – खेडच्या पश्चिम भागाला आतापर्यंत वंचित ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता या निवडणुकीत जागा दाखवेल. “आली रे आली, आता आमची बारी आली’ “आता आमची सटकली’ या तालुक्यात “सिंघमगिरी’ खपवून घेतली जाणार नाही. या “सिंघम’ला “चिंगम’ केल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात अतुल देशमुख यांनी आमदार सुरेश गोरे यांचे नाव न घेता केला आहे.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांची वाडा येथे प्रचार सभा झाली. या सभेला पश्चिम भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी गटनेते शरद बुट्टे पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कैलास गाळव, नगरसेविका रेखा क्षोत्रिय, संपदा सांडभोर, संगीता गायकवाड, कल्पना देशमुख, दीप्ती कुलकर्णी, वाड्याचे सरपंच रघुनाथ लांडगे, बाळासाहेब शिंदे, गोरक्ष चेहेरे, कडूसच्या सरपंच जयश्री नेहेरे, डेहणेचे उपसरपंच संकर कोरडे,अशोक नाईकरे, कुमुदिनी केदारी, अक्षय केदारी, काळूराम आतकर, सुधीर भोमाळे, सुभाष डोळस, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
अतुल देशमुख म्हणाले, आजी-माजी केवळ तालुक्यात किती निधी आणला याचे आकडेमोड करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र कमी काम केले आहे. खेडच्या आदिवासी भाग कायमच वंचित ठेवला आहे. पश्चिम भागाचा विकास साधण्यात ते अपयशी ठरले असून जनतेची फसवणूक करीत आहेत. मुंबई-भीमाशंकर रस्ता झाला नाही याला आमदार गोरे कारणीभूत आहेत. त्यांनी पाठपुरावा न केल्याने 5 वर्षांपूर्वी सर्वेक्षण होऊनही रस्ता झाला नाही. अखेर मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पाठपुराव्यातून 6 कोटींचा निधी मिळाला आहे मी खूप शांत आहे मला निवडून द्या म्हणणे हे शांत पणाचे लक्षण आहे का, असे त्यांनी नमूद केले.
शरद बुट्टे पाटील म्हणाले की, आताचे आमदार भीमाशंकरला मोठा निधी आणला असे सांगतात; पण त्यातील खेडला किती निधी आला हे
त्यांनी सांगावे. भीमाशंकर बाबत आपले आमदार गप्प का, आजवर ज्यांना पश्चि भागाने आमदार केले त्या पश्चिम भागाला आणि समाजाला हे विसरले.
सभेसाठी “त्यांना’ माणसे विकत आणण्याची वेळ आमची युती लबाडांशी नाही तर मातीशी आहे. आदिवासींच्या योजना राबविताना आपला तालुका मागे का? आजी-माजी आमदारांनी याचे उत्तर द्यावे.
सभेसाठी विरोधकांना रोजाने माणसे आणावी लागली. यांना माणसे विकत आणण्याची वेळ येत असल्याने त्यांचा पराभव निश्चित आहे. तसेच अतुल देशमुख यांना मिळणाऱ्या जनप्रतिसादामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी स्पष्ट केले.