इंदापूर – येत्या २३ मार्च रोजी सकाळी दहा वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या प्रांगणावर देशाचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर सभा व शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
या मेळाव्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, उद्योजक श्रीनिवास पवार, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवा नेते युगेंद्र पवार, सभेला संबोधित करणार आहेत. (The public meeting of Mahavikas Aghadi will be held in Indapur in the presence of Sharad Pawar)
यासाठी तालुक्यातील शेतकरी नागरिकांनी युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष एडवोकेट तेजसिंह पाटील तसेच कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केले आहे.
इंदापूर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (ता.१९ मार्च) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष एडवोकेट तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महादेव सोमवंशी, पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे, प्रदेश कार्यकारी सदस्य अमोल भिसे, दादासाहेब थोरात, सुनिल खाडे, अक्षय कोकाटे, संजय शिंदे, राजुभैय्या शेख, सिंकदर बागवान, विकास खिलारे यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे माहिती देताना कार्याध्यक्ष महारुद्र पाटील म्हणाले की, देशात दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार काम करत आहे. केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या त्यामधील एकही घोषणेची पूर्तता केलेली नाही. अवघ्या तीनशे रुपयाला मिळणारा सिलेंडर अकराशे बाराशे रुपयावर पोहोचला. पेट्रोलचे दर पन्नास रुपये प्रति लिटर होता ते शंभर रुपयाच्या पुढेे गेले. डिझेल पेट्रोलचे दर तसेच सिलेंडरचे दर कमी करण्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर प्रचंड संतापली आहे. जनतेचा आक्रोश लोकसभेच्या मतदान पेटीतून व्यक्त होईल, असा आशावाद महारुद्र पाटील यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा वर्गना केल्या. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी केली नाही. प्रत्येक वर्षी दोन कोटी जनतेला नोकरी देऊ अशा फसव्या घोषणा भारतीय जनता पार्टीने केल्या. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात भाजप विषयी रोज निर्माण झाला आहे, अशी टीका महारुद्र पाटील यांनी केली.
यावेळीे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या दुधाला दर योग्य देण्याची भूमिका सरकारने करणे गरजेचे होते. मात्र दर कमी केलेला जीआर काढून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. कोणताही नवीन रोजगार उद्योग या परिसरामध्ये सरकारच्या माध्यमातून आलेला नाही. धर्माच्या नावाखाली डोके भडकवण्याचे काम भाजप करत असल्याचा घाणाघात तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी केला.