मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेकडे पाहिले जाते. तिने अल्पावधीतच सिनेसृष्टीत आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रार्थना ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने दीड वर्षांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत तिच्या पतीने आणि तिने लग्नानंतर मूल न होण्याचा निर्णय घेतला. यावर एका मुलाखती दरम्यान तिने खुलासा केला आहे. तिच्या या निर्णयामुळे प्रार्थना चर्चेत आली होती. आता तिने एका मुलाखती दरम्यान या निर्णयामागचा खुलासा केला असून त्यामागचे कारण सांगितले आहे. या मुलाखतीवेळी आम्ही असं एकलंय की तू १५-२० मुलांची आई आहेस आणि तू हे लपवून ठेवलंय? यावर प्रार्थनाने मी यापूर्वीही सांगितलं आहे, की मला १५-२० मुलं आहेत, इतकंच नाही तर यातला एक मुलगा तर लग्नाआधीच होता. त्याचं नाव गब्बर आहे. तो माझ्या सर्वात मोठा डॉग आहे. आमच्या घरी सात डॉग्ज आहेत. तर आमच्या फार्महाऊसवर पण अनेक श्वान आहेत. तसंच फार्महाऊसवर गायी आणि घोडे देखील आहे. श्वान, गायी, १०-१२ घोडे आहेत…ही आमची मुलंच आहेत, असे उत्तर प्रार्थनाने दिले. या सगळ्यांचा सांभाळ करणं सोपं नाहीए कठीणच आहे. इच्छाशक्ती असली की हे शक्य होतं. या प्राण्यांनाही आपल्याकडून फक्त प्रेमच हवंय. त्यामुळं मी आणि माझ्या नवऱ्यानं ठरवलं आहे की, हिच आपली आपली मुलं आहेत. आता आपल्याला मनुष्याची मुलं नकोत. आपण यांचाच सांभाळ करू, असे उत्तर प्रार्थनाने या प्रश्नावर दिले आहे. तिच्या या उत्तरामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रार्थनाने मितवा आणि कॅाफी आणि बरचं काही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली आहे. तसेच तिने टेलिव्हिजनवर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास पवित्र रिश्मा या मालिकेद्वारे झाला. तिचं २०१७ मध्ये अभिषेक जावकरशी लग्न झालं आहे. ती आता मुंबई सोडून अलिबागमध्ये स्थायिक झाली आहे.