नवी दिल्ली : एकविसाव्या शतकातला भारत विकासाच्या धोरणावर चालणार असून द्वेषाच्या राजकारणाला येथे थारा नाही असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल. ते आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादरामध्ये बोलत होते.
भाजप सकारात्मकतेवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. देशासाठी भाजपचे संकल्प मोठे आहेत. देशासमोरली आव्हाने आम्ही सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दिल्लीच्या जनतेने विकासात योदान दिले आहे.
देशाच्या फाळणीनंतर जे लोक दिल्लीत स्थिरावले त्यांनी त्यांनी दिल्लीला विकासाच्या दिशेने नेले असे पंतप्रधान म्हणाले. दिल्लीच्या अवैध झोपडपट्ट्यांचा प्रश्न भाजप सरकारने सोडवला. देशाचे हित आमच्यासाठी सर्वात मोठे आहे. दिल्लीत होणारे मतदान देशाला उंचीवर नेणारे असेल असेही ते म्हणाले.
झोपड्यामध्ये, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांना पक्कं घर देण्यासाठी वेगाने आमचे सरकार काम करून गरिबाला लवकर पक्के घर उपलब्ध करून देण्यात येईल असा दावा त्यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला. दिल्लीच्या जनतेचे मत परिवर्तन झाले असून दिल्लीत स्पष्ट परिवर्तन दिसत असल्याचे मोदी म्हणाले.