मुंबई- सध्या मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात आहे. त्यात सामाजिक विषयांचं भान राखून सहज सोप्या पद्धतीने विषयांची मांडणी होताना दिसते आहे. पुर्वीच्या मालिक सासू-सुनेच्या वादासाठी प्रसिद्ध होत्या. मात्र जसा काळ बदलला तसे प्रेक्षकही बदलले. त्यामुळे दिग्दर्शकांनी नव्यानं नात्यांना उलगडा देण्याचं काम केल. आता अनेक मालिकांमधील सासू-सुनेची जोडी मैत्रीसाठी प्रसिद्ध आहे.
माझ्या नवऱ्याची बायको, शुभमंगल ऑनलाईन, अगं बाई सासू बाई, आई कुठे काय करते? या मालिकेत सध्य़ा सासू सुनेच्या जोडीवर आधारित चित्र रंगताना दिसत आहेत. त्यांच चांगलंच जमताना दिसते आहे. प्रत्येक संकटात स्त्री शक्ती एकवटून दोघी सामना करताना बघायला मिळत आहे.
पुर्वी सासू-सुनेचं सुद्धा पात्र रंगवण्यासाठी फार कसरत करावी लागायची. नाट्य रंगवावं लागायचं आतात सगळीच नाती वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. सासू-सुनेचा बदलणारा ट्रेन्ड लेखक म्हणून चांगलाच आहे. महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांनीही ते सहज स्विकारलं आहे, असं आई कुठेकाय करते मालिकेच्या लेखिका मुग्घा गोडबोले य़ांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शुभ्रा- आसावरी, शर्वरी- पमा, अरुंधती- आई आणि आता नव्यानं सुरु झालेल्या श्रीमंताघरची सुन मालिकेतील सासू-सुनेची जोडीसुद्ध हीट होणार असल्याचं प्रोमोमधून समजतं आहे.