नागपूर: नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद चांगलंच टोकाला गेला आहे. संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’मध्ये 20 कोटींचा घोटाळा केला. तसेच तुकाराम मुंढे यांनी मर्जितल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिला. आणि अन्य दोन अधिकाऱ्यांसोबत मिळून पदाचा गैरवापर केला. त्यांनी जबरदस्तीने 20 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप, जोशी यांनी केला. तशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.
दरम्यान, व्यक्तिगत टीका केल्यामुळे काल तुकाराम मुंढे यांनी सभात्याग केला होता. त्यानंतर महापौरांनी त्यांच्यावर टीका केली होती. एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढत असताना. राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महापौर जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. त्यांनी मला शहाणपण शिकवू नये’, अशा शब्दात टीका केली. आता थेट घोटाळ्याचे आरोप केल्यामुळे नागपुरात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे.