पुणे – परांजपे स्कीम्सने साकारलेल्या अथश्री प्रकल्पामध्ये वास्तव्य करणाऱ्या सुमारे 1 हजारपेक्षा अधिक ज्येष्ठांचे जीवन सध्याच्या परिस्थितीतही सुकर आहे, त्यांना जीवनावश्यक गोष्टींसाठी बाहेर जावे लागत नाही, त्यांना त्या गोष्टी घरपोच मिळत आहेत. मग ती औषधे असोत, भाजीपाला असो किंवा किराणा. या सगळ्या गोष्टींची काळजी घेणारा, 24 तांस या प्रकल्पामध्ये स्थायिक असलेला अथश्रीमधील रेसिडेंट मॅनेजर आणि त्याची सहकारी टीम ही सगळी कामे त्यांच्यासाठी करत आहे.
करोनाचा धोका लहान मुले आणि ज्येष्ठांना अधिक असल्यामुळे त्यांना घराबाहेर जाता येत नाही. परंतु, परांजपे स्कीम्सचे ज्येष्ठांसाठी साकारलेले अथश्री प्रकल्प याला अपवाद ठरले आहेत. अथश्री बाणेरस्थित सीमा नखाते म्हणाल्या, तापमान गन उपलब्ध करून दिल्यामुळे बाहेरून आत येणाऱ्या व्यक्तींच्या अंगात ताप आहे की नाही हे अथश्रीच्या गेटवर तपासता येऊ लागले आहे. आमचे रेसिडेंट मॅनेजर संतोष वाबळे, आणि त्यांचे सहकारी गणेश, व्यंकेटी आणि स्वप्नील या स्टाफच्या सहाय्याने किराणा माल, भाजीपाला आणि फळे तसेच औषधे हे आम्हाला देतात.
बिल्डिंगची स्वच्छता आहे आणि सिक्युरिटी 24 तांस आहे. रेसिडेंट मॅनेजर आणि त्याचे सहकारी सर्व ज्येष्ठांची वैयक्तिक पातळीवरही काळजी घेत आहेत. त्यांच्या शरीराचे तापमान इन्फ्रा रेड-नॉन कॉन्टॅक्ट थर्मल गनच्या सहाय्याने दररोज तपासले जाते आणि जर एखाद्या ज्येष्ठाचे तापमान जास्त आढळल्यास त्वरित डॉक्टरांना कळविले जाते.
अथश्री परिसराबाहेरून येणाऱ्या सर्व वस्तू सर्वप्रथम साबणाच्या पाण्यात टाकून स्वच्छ केल्या जातात आणि मगच त्या रहिवाशांपर्यंत पोहोचविल्या जातात. तसेच, सर्व स्टाफला मेडिकल इमरजेंसी सर्विसचे प्रक्षिशण दिलेले असून प्रत्येक अथश्रीमध्ये चालका सहित ऍम्ब्युलन्स उपलब्ध आहे.