जामखेड – संकट कुठलं ही असो त्या संकटाशी सर्वानी मिळून एकजुटीने मुकाबला केला तर त्यावर आपण कधीही मात करू शकतो,हाच विचार सारोळा गावातील सर्वानी मिळून केला आणि त्यामुळेच आज आदर्श गाव सारोळा हे कोरोनाशी लढा देतंय.
कोरोना विषाणू ने जगभरात थैमान घातलंय आणि अश्यावेळी आपण सर्वानी प्रशासनाला योग्य ते सहकार्य केले पाहिजे,सारोळा गाव प्रशासनाला सहकार्य करतेच आहे पण त्याचबरोबर गावातील सर्व लोकांना 2500 मास्क वाटण्याचा निर्णय सरपंच अजय दादा काशीद यांच्या पुढाकाराने घेण्यात आला प्रत्येक माणसाला मास्क वाटप करावे असा एकमुखी निर्णय सर्व गावकऱ्यांनी घेतला आणि ग्रामपंचायत च्या वस्तीने सर्वांना मास्क देण्याचे ठरवले.
कोरोना विषाणू चा संसर्ग होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने ही खबरदारी घेण्यात येत आहे. याचबरोबर गावातील दुर्लक्षित घटकांना देखील किराणा सामानाचे वाटप करण्यात येत आहे आणि कोरोना पासून गाव हे कसे अलिप्त राहील याची खबरदारी घेतली जात आहे,याकामी सरपंच अजय काशीद आणि सर्व ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेतला आहे.
नान्नज येथील बचत गटाचे असेही एक माणुसकीचे दर्शन:
सारोळा गावाने नान्नज येथील ओमसाई महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला 2500 मास्क बनवण्याचे काम दिले यावेळी या बचत गटाच्या माध्यमातून त्यातून मिळणारा जो नफा होता त्या पैश्याचे नान्नज येथील निराधार महिलांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले या कामी बचत गटाच्या अध्यक्षा सौ मनीषा अर्जुन मोहळकर,अनिता मोहळकर, दीपाली शिंदे,दर्शना साळवे,मनिषा अनिल हजारे यांचे सहकार्य लाभले,यावेळी सरपंच अजय काशीद यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
सारोळा गाव संपूर्ण गावाला मास्क वाटप करत आहे त्यामुळे आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे ही भावना मनात आल्याने आम्ही बचत गटाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला आणि निराधार महिलांना किराणा वाटप केला आणि ही कल्पना आम्हाला सरपंच अजय काशीद यांच्यामुळेच सुचली असे उदगार बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा मोहळकर यांनी काढले. सरपंच अजय काशीद यांनी प्रत्येक गावात तरुणांना आवाहन करून गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले आहे.