नवी दिल्ली – एअर इंडिया तर्फे विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन चालवले जात आहे. त्याचा चौथा टप्पा 3 जुलै पासून सुरू होत आहे. तीन ते 15 जुलैपर्यंत चालणाऱ्या या टप्प्यात 17 देशांतील नागरीकांना भारतात आणले जाणार आहे. गेल्या 6 मे पासून ही मोहीम सुरू आहे.
या चौथ्या टप्प्यात 170 विमाने 17 देशांत पाठवली जाणार आहेत. त्यात अमेरिका,ब्रिटन, केनिया, श्रीलंका, फिलिपाईन्स, किरगीझस्तान, सौदी अरेबिया, बांगलादेश, दक्षिण अफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, जपान, युक्रेन, व्हिएतनाम इत्यादी देशातील भारतीयांना परत आणले जाणार आहे.
अमेरिकेत 38 आणि ब्रिटन मध्ये 32 विमाने पाठवली जाणार आहेत. तर सौदी अरेबियासाठी 26 विमाने पाठवली जाणार आहेत.