मुंबई – पालघर हत्याकांड प्रकरणी देशभरातून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठत आहे. अशातच आता याप्रकरणावर मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
उमा भारती म्हणाल्या कि, पालघर प्रकरणी आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी. तसेच पोलसांनी हवेत फायरिंग करूनही साधूंना वाचविता आले असते. पोलिसांसमोर हे महापाप झालं आहे. त्यामुळे सर्व दोषींना फाशीची शिक्षा व्हायला हवी नाहीतर तुम्हीही या पापाचे भागीदार बनताल, महान संतांच्या हत्येत होरपळून ठाकरे राखरांगोळी होईल, अशी टीकाही उमा भारती यांनी केली आहे.
हत्या झालेल्या महान संतांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि या महापातकचे प्रायश्चित्त म्हणून साधू- संतांनी आहे त्याच ठिकाणी उपवास करावा, असे आवाहनही उमा भारती यांनी केले आहे.
4. लगता है कि उद्धव ठाकरे जी की सरकार इन महान संतों की हत्या से झुलसकर राख हो जाएगी, जूना अखाड़े के साथ मेरे आत्मीय संबंध हैं मैं इस घटना को कभी भूलूंगी नहीं। सारे देश को इस घटना की निंदा करनी चाहिए।
— Uma Bharti (@umasribharti) April 20, 2020
दरम्यान, पालघर प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, माझे गृहमंत्री त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणे झाले आहे. याठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही. तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे, असे आपण त्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांवर देखील या जमावाने हल्ला केला तसेच त्यांच्या वाहनांची नासधूस केली, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.