हिंगोली – राज्यभरात मोठ्या उत्सहात दिवाळी सण साजरा करण्यात येत आहे. उद्या भाऊबीज असून बहिण-भावांचा हा सण साजरा करण्यात येणार आहे. अशा उत्साही वातावरणात एक वाईट बातमी समोर आली आहे. एका अपघात भाऊबीजेपूर्वी सख्ख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही हृदयद्रावक घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात टाकळगाव रोडवर घडली आहे. दिवाळीत मामाच्या गावी जात असताना टाटा एस मॅजिक पिकपने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये 9 वर्षीय भावाचा व 8 वर्षीय बहिणीचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर दोन जण जखमी झाले आहेत.
आदर्श अरविंद सूर्य व कीर्ती अरविंद सूर्य असे अपघातात मृत्यू झालेल्या बहिण-भावाची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.