पुणे – लॉकडाऊनच्या पाचव्या टप्यात केंद्र सरकारने मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचे जाहीर केले असले तरी महाराष्ट्रातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मंदिरे आणि प्रार्थना स्थळे उघडण्यात यावी, यासाठी ब्राम्हण संघाच्या वतीने कसबा गणपती मंदिरासमोर शंखनाद आणि घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.