चेन्नई :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकला आहे. यासह कांगारू संघाने मालिकाही 2-1 अशी जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया 248 धावांवर गडगडली आणि सामना गमावला.
What a game 💥
Australia clinch the decider in Chennai to bag the ODI series 2-1 🙌#INDvAUS | 📝: https://t.co/ugxHxHyT1z pic.twitter.com/5kU9WRDiYP
— ICC (@ICC) March 22, 2023
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 269 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने चांगली सुरुवात केली आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला, पण अखेरीस भारताने सतत विकेट गमावल्या आणि संपूर्ण संघ 248 धावांवर गारद झाला. कोहलीने 72 चेंडूत 54 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 40 चेंडूत 40 धावा केल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकांत 269 धावांवर आटोपला होता. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 तर एलेक्स कैरी याने 38 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.