“मी बायकोच्या छळाला कंटाळलो, ‘पप्पा सॉरी, मम्मी सॉरी, अक्कू सॉरी’..” ; TCS मॅनेजरने लाईव्ह व्हिडिओ करत उचललं टोकाचं पाऊल

TCS Manager Manav Sharma । आग्र्यातील इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. त्यानंतर आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. टीसीएस या आयटी कंपनीच्या रिक्रूटमेंट मॅनेजरने लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या केली. व्हिडिओमध्ये त्याने पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. यात त्याने,”माफ करा आई आणि बाबा. मी माझ्या पत्नीला कंटाळलो आहे. कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकाकी होतात. बायको मला धमकावते.” असे म्हटले आहे. 6 मिनिटे 57 सेकंदांचा हा व्हिडिओ 24 फेब्रुवारीचा आहे. मृताच्या वडिलांनी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली आहे.
सूनेचा प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा TCS Manager Manav Sharma ।
सदर परिसरातील डिफेन्स कॉलनी येथे राहणारा मानव शर्मा हा मुंबईतील टीसीएसमध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. एअरफोर्समधून निवृत्त झालेले वडील नरेंद्र शर्मा यांनी, “मुलाचे लग्न 30 जानेवारी 2024 रोजी बर्हानशी झाले होते. यानंतर सूनही आपल्या मुलाकडे राहण्यासाठी मुंबईला गेली. काही दिवस चांगले गेले, पण त्यानंतर सून रोज भांडू लागली. कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या ती देऊ लागली. सून प्रियकरासोबत राहण्याबाबत बोलू लागली.” अशी माहिती दिली.
पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास दिला नकार
23 फेब्रुवारी रोजी सून आणि मुलगा मुंबईहून घरी आले. त्याच दिवशी मानव पत्नीला सोडण्यासाठी माहेरी गेला होता. तेथे मानवला त्याच्या सासरच्या मंडळींनी धमकावले. दुसऱ्या दिवशी (24 फेब्रुवारी) पहाटे पाच वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही त्याला लष्करी रुग्णालयात नेले, त्याठिकाणी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. 26 फेब्रुवारी रोजी मी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलो. तेथील पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. अधिकारी महाशिवरात्रीच्या ड्युटीवर असल्याचे सांगितले. मी घरी परतलो. त्यानंतर मी सीएम पोर्टलवर तक्रार पत्र लिहिले.
‘पप्पा सॉरी, मम्मी सॉरी, अक्कू सॉरी’ TCS Manager Manav Sharma ।
मानव व्हिडिओमध्ये म्हणाला की, मी जाईन. पुरुषांबद्दल विचार करा, कृपया विचार करा, कोणीतरी पुरुषांबद्दल बोलले पाहिजे. गरीब माणूस खूप एकटा आहे. पप्पा सॉरी, मम्मी सॉरी, अक्कू सॉरी. मी निघून गेल्यावर सर्व काही ठीक होईल.यानंतर तो रडू लागतो. शेवटच्या क्षणी हसून करायचंच असेल तर नीट कर, असं म्हणतो. अश्रू पुसत तो म्हणतो, “माझ्या पालकांना हात लावू नका.”
कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिली नाही
दरम्यान, इन्स्पेक्टर सदर वीरेश पाल गिरी म्हणाले की, पोस्टमॉर्टमच्या वेळी कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिली नाही. गुरुवारी रात्री उशिरा व्हॉट्सॲपवर ही तक्रार आली. यावरूनच गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
हेही वाचा





