Tatanagar-Ernakulam Express । आंध्र प्रदेशातील यलमंचिलीत एक मोठा रेल्वे अपघात झालाय. टाटा-एर्नाकुलम एक्सप्रेस ट्रेनच्या B1 आणि M2 डब्यांमध्ये अचानक आग लागली. या आगीत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं आहे. तर इतर अनेक प्रवासी थोडक्यात बचावले. रात्री १२ ते १ च्या दरम्यान आग लागली. आगीमुळे ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. परंतु अनेक प्रवाशांना वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या अपघातात रेल्वेचे डबे पूर्णपणे जळून खाक झालेत. आगीची माहिती मिळताच लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली. रेल्वे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यास सुरुवात केली. दरम्यान,समोर आलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या दृष्टीनं दोन्ही डब्बे रेल्वेपासून वेगळे करण्यात आले असून आग नेमकी कोणत्या कारणामुळं लागली याचा तपास करण्यात येणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती Tatanagar-Ernakulam Express । एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना यालामंचिलीजवळ घडली. सोमवारी पहाटे १२:४५ वाजता अधिकाऱ्यांना आगीची माहिती मिळाली.आग लागली तेव्हा एका बाधित डब्यात ८२ प्रवासी होते तर दुसऱ्या डब्यात ७६ प्रवासी होते. दुर्दैवाने, कोच बी१ मधून एकाचा मृतदेह सापडला.”असे त्यांनी म्हटले. घंटेचा तपास सुरू Tatanagar-Ernakulam Express । अधिकाऱ्यांनी याविषयी पुढे बोलताना,”दोन्ही डबे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आग अत्यंत भीषण होती. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि मृतांची नेमकी संख्या निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.