मुंबई : देशात सर्वाधिक करोनाचे रुग्ण राज्यात आढळल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला.
तसेच करोनाचा सामना आणि योग्य ती उपाययोजनाकरण्यासाठी केंद्राकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासही त्यांनी दिले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये आज 11 वाजेच्या सुमारास 15 मिनिटे चर्चा झाली. यावेळी मोदींनी राज्यातील करोनाची लागण झालेले रुग्ण, संशयित रुग्णांची माहिती घेतली.
तसेच राज्य सरकारने बनविलेले विलगीकरण केंद्रांची माहिती घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनीही राज्य सरकारने करोना रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची पंतप्रधानांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.