Women’s T20 World Cup 2024 (Semi-Final 2024) : सध्या खेळल्या जात असलेल्या महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची स्थिती खराब झाली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ग्रुप स्टेजचे चारही सामने खेळले आहेत, ज्यामध्ये टीमने 2 जिंकले आहेत आणि 2 हरले आहेत. भारतीय संघाने ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे. आता टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्ताननं न्यूझीलंडविरूध्दचा सामना जिंकणे आवश्यक झाले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे, ज्यामध्ये एकूण 5 संघ आहेत. सर्व संघांना प्रत्येकी 4-4 सामने खेळायचे आहेत, त्यानंतर अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. गटात अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, तर गटात तळाच्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेचा संघ बाहेर पडला आहे. आता उपांत्य फेरीतील स्थानासाठी भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात लढत आहे. टीम इंडियाने आपले चारही सामने खेळले आहेत. तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांना आज, सोमवारी (14 ऑक्टोबर) एकमेकांविरुद्ध गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळायचा आहे. या सामन्याच्या निकालानंतर उपांत्यफेरीत जाणार दुसरा संघ कोण असणार हे स्पष्ट होणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तान जिंकावे हीच भारतीय संघाची इच्छा असणार आहे. पाकिस्तानच्या विजयाचा टीम इंडियाला होणार फायदा…? न्यूझीलंडचे 3 सामने खेळून 4 गुण आहेत, तर पाकिस्तानचे 3 सामने खेळून 2 गुण आहेत. तर टीम इंडियाचे 4 सामने खेळून 4 गुण झाले आहेत. अशा परिस्थितीत जर न्यूझीलंडने शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले तर किवी महिला संघ थेट 6 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचेल आणि त्याचबरोबर भारताचे आव्हानही संपुष्टात येईल. Women’s T20 World Cup 2024 : सलग चौथ्या विजयासह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत…! हरमनप्रीतची अर्धशतकी खेळी व्यर्थ, भारत 9 धावांनी पराभूत… दुसरीकडे, जर पाकिस्तानने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला, तर उपांत्य फेरीच्या शर्यतीतील तिन्ही संघांचे गुण समान (4-4) होतील. मग या स्थितीत चांगला नेट रनरेट असलेला संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. सध्या टीम इंडियाचा नेट रन रेट सर्वोत्तम आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करावा अशी टीम इंडियाची इच्छा असेल, त्यासाठी टीम इंडियाला पाकिस्तान जिंकू दे अशी प्रार्थना करावी लागेल.