Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आपल्या पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या आज सातारा आणि फलटणचा दौरा करणार आहेत. यावेळी सुनेत्रा पवार कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीची दर्शन घेतील. अजित पवार यांनी अनेकदा आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी देखील अजित पवारांचे विचार पुढे नेत आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा पहिलाच शासकीय दौरा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज कराड आणि फलटणच्या दौऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार आज सकाळीच साताऱ्याकडे रवाना झाल्या. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांचा पहिलाच शासकीय दौरा आहे. Sunetra Pawar : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी दर्शन घेणार कराड येथे 10 वाजता सुनेत्रा पवार या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित पवारांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. Dr Aruna Dhere : शिक्षकांमुळेच शाळांचे रूप पालटतेय; हुजूरपागेच्या अमृत महोत्सवी डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन कसा असणार नियोजित दौरा ? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सकाळी 10 वाजता कराड येथील प्रितीसंगम बाग येथे आगमन होईल. त्यानंतर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करत त्यांना आदरांजली वाहतील. दुपारी 11 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार फलटणकडे रवाना होतील. दुपारी 1 वाजता त्या कै. विदीप जाधव यांच्या निवासस्थानी (लोणंद, तरडगाव, ता. फलटण) कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतील. Sunetra Pawar : दरम्यान, अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला, त्यावेळी सुरक्षारक्षक विदीप जाधव हे त्यांच्यासोबत विमानात होते. विमान कोसळल्यानंतर विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याची घोषणा केली होती. हेही वाचा: Dr Aruna Dhere : शिक्षकांमुळेच शाळांचे रूप पालटतेय; हुजूरपागेच्या अमृत महोत्सवी डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन