Success Story : उद्योग जगतातील उगवता तारा म्हणजे ‘बाजीगर मीना’ : एवढ्या लहान वयात उत्तुंग यश मिळवण्याचा थक्क करणारा प्रवास

Baazigar Meena : आजच्या काळात स्टार्टअप्सबाबत तरुणाईमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यात असे काही तरुण आहेत कमी वयात उद्योग जगतात आपली छाप टाकत आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींची नावे तुम्ही ऐकली असतीलच, पण २०-२२ या एवढ्या कमी वयात आपल्या जिद्द आणि चिकाटीने उद्योग जगात एकच खळबळ उडवून देणारे मोजकेच असतात. त्यातील सध्या असाच एक उद्योग जगात उगवता तारा म्हणून ज्याने आपली ओळख निर्माण केली आहे तो म्हणजे बाजीगर मीना…त्याला त्याच्या कार्य कौशल्याच्या जोरावरच यंदाचा “नॅशनल स्टार अवॉर्ड 2024” साठी नामांकन मिळाले आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास…
बाजीगर मीना यांचा जन्म 29 जून 1998 रोजी राजस्थानमध्ये झाला. त्यांचे कुटुंब एक पारंपरिक आणि रीतीभाती पाळणारे कुटुंब आहे. सध्या बाजीगर मीना महाराष्ट्रातील रत्नागिरी नगरचे रहिवासी आहेत. बाजीगर मीना यांनी आपल्या कमी वयातच आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर नवनवीन प्रयोग करून उद्योग स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या याच प्रयत्नाच्या जोरदार बाजीगर मीना यांनी केशव ग्रुप आणि आरके ग्रुप इंडस्ट्रीजची स्थापन केली. दरम्यन, याविषयी बोलताना त्यांनी इंडस्ट्रीतील तरुण उदयोन्मुख प्रतिभांकडून त्यांना प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
बाजीगर यांचे वडील आर के मीना हे त्यांच्यासाठी प्रेरणास्त्रोत असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय वडिलांना दिले आहे. बाजीगर मीनाचे आदर्श रतन टाटा आहेत. “आयुष्य हे सायकलसारखे आहे. तुमचा तोल सांभाळण्यासाठी तुम्हाला सतत चालत रहाणे गरजेचे असते. हे उदाहरण त्यांच्यासाठी गरजेचे ज्यांना आपल्या आयुष्यात इच्छित ध्येय साध्य करायचे आहे.
बाजीगर मीनाची कहाणी त्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे जे आपली स्वप्ने साकार करण्यासाठी धडपडत आहेत. त्याच्या यशाने हे सिद्ध केले आहे की अडचणी केवळ तात्पुरत्या असतात, केवळ यश शाश्वत असते. त्याच्या प्रवासाने आपल्याला शिकवले आहे की आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो.
बाजीगर मीना यांची गोष्ट आपल्याला हे देखील दर्शवते की जेव्हा आपण आपल्या कामावर प्रेम करतो आणि त्याला समर्पित असतो तेव्हाच खरे यश मिळते. नॅशनल स्टार अवॉर्ड नामांकन हे बाजीगर यांच्या वैयक्तिक यशाचेच प्रतिबिंब नाही तर नवोदित उद्योजकांसाठी आशेचा किरण देखील वाढवते.





