मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते सुधीर मुनगंटीवार , राम कदम, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा, अशी मागणी राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या पत्रात केली आहे.
यावर रावसाहेब दानवे म्हणाले,’ईडीची कारवाई आताच होते का? गुन्हेगार नसाल तर घाबरायचे काय कारण आहे ? असा सवाल दानवे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारला आहे. राऊत यांनी ईडी तसेच इतर केंद्रीय संस्थांकडून बेकायदेशीर चौकशी केली जात असल्याचा आरोप केला आहे. यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लालूप्रसाद यादव, अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई झाली, तर सुरेश कलमाडी हे तुरुंगात गेले तेव्हा कुणाचे सरकार होते? महाराष्ट्राचा अपमान महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी केला. असा म्हणत दानवे यांनी राऊतांच्या आरोपावर प्रतिउत्तर दिले आहे.