मुंबई – टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजेच, “कौन बनेगा करोडपती’चा 12 वा सीजन सध्या महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला स्क्रीनवर पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद होत आहे.
दरम्यान, कौन बनेगा करोडपतीच्या12 व्या सीझनने इतिहास रचला आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत तीन करोडपती मिळाले आहेत. नुकतंच करोडपतीचा एक एपिसोड प्रदर्शित करण्यात आला असून, या मध्ये एका शेतकरी तरुणाने तब्ब्ल 50 लाख रुपये जिंकले आहेत.
View this post on Instagram
तेज बहादुर सिंह असं या स्पर्धकाचं नाव. तेज ने 14 प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन 50 लाख रूपये जिंकले. या स्पर्धकाने खेळ इतका चांगला खेळला की, अमिताभ बच्चन सुद्धा त्याचं भरभरून कौतुक करत होते. दरम्यान, यावेळी अमिताभ यांना त्याला 1 कोटी रूपयांचा प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. पण तेज 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही. आणि खेळ क्विट केला.
View this post on Instagram