मुंबई – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगण्याचं विधान केल्यामुळे सीमाप्रश्नाचं राजकारण चांगलच तापू लागलं आहे. त्यातच आता बेळगावात सुरु असलेल्या मराठी बांधवांवरील अत्याचाराविरोधात महाराष्ट्रातील एकाही भाजप पुढाऱ्याने धिक्कार केला नाही. तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अपमान होत असताना खोके गटाचा एकही स्वाभिमानी आमदार उसळून उठलेला दिसत नाही अशा शब्दात सामनातून निशाणा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी घेतलेल्या मवाळ भूमिकेबाबत सामानातून भाष्य करण्यात आलं आहे. तसेच खोके सरकारमध्ये जीव नाही की मनगटात सळसळ नाही ? अशा मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल, त्यातच सगळ्यांचे हित आहे अशा कडक शब्दात शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.
“महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या खोके सरकारात जीव नाही. मनगटात सळसळ नाही,लढण्याची धमक नाही. महाराष्ट्र कालपर्यंत पाणी दाखवत होता आज महाराष्ट्राचे पाणी चोखले जात आहे. मिंध्याचें सरकार लाथ मारून घालवावेच लागेल” त्यातच सगळ्यांचे हीत असल्याचे सामनातून म्हंटले आहे.
सामनामधील महत्वाचे मुद्दे
बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात यावा, असे महाराष्ट्र भाजपाला खरेच वाटत आहे का, ही शंकाच आहे.
सीमाभागातील तरुणांना महाराष्ट्रातील विद्यापीठात राखीव जागा ठेवण्याचा निर्णय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता.
बाजूचे गुजरात राज्य महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय पळवत आहे तर कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व मुद्द्यांवर गप्प आहेत.
सरकार वाचवण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत