Stress: आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव म्हणजेच स्ट्रेस ही समस्या खूप सामान्य झाली आहे. कामाचा दबाव, आर्थिक चिंता, नातेसंबंधातील तणाव आणि सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे अनेकजण मानसिक तणावाचा सामना करत आहेत. विशेष म्हणजे फक्त मोठ्यांनाच नाही, तर तरुण आणि मुलांमध्येही स्ट्रेस आणि एंग्जायटीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थोडाफार ताण येणं ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे आपलं शरीर कठीण परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार होतं. मात्र, हा ताण सतत राहू लागला तर त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. काही तासांचा स्ट्रेससुद्धा शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांवर परिणाम करू शकतो. ताण वाढला की शरीरात ‘कॉर्टिसोल’ आणि ‘अॅड्रेनालिन’ हे हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शरीराला सतर्क ठेवतात, पण दीर्घकाळ त्यांचं प्रमाण वाढलं तर आरोग्य धोक्यात येऊ शकतं. विशेषतः हृदय, मेंदू, पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो. (Stress) स्ट्रेसचा सर्वात मोठा परिणाम हृदयावर होतो. ताणाच्या स्थितीत शरीर ‘फाइट मोड’मध्ये जातं. त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तदाबही वाढू शकतो. सतत तणावात राहिल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. (Stress) Stress: काही तासांचा ताणही ठरू शकतो धोकादायक! स्ट्रेसमुळे शरीरात सुरू होतात ‘या’ गंभीर समस्य ताणामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते. शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची कार्यक्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे संसर्ग, सर्दी, खोकला आणि इतर आजारांचा धोका वाढतो. कॉर्टिसोलचं प्रमाण वाढल्यामुळे शरीरात सूज निर्माण होण्याचाही धोका असतो. Stress पचनसंस्थेवरही स्ट्रेसचा वाईट परिणाम होतो. ताण वाढला की शरीर पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही लोक तणावात जास्त खातात, तर काहींची भूकच कमी होते. यामुळे मेटाबॉलिझमवर परिणाम होतो. मानसिक आरोग्यावरही तणाव गंभीर परिणाम करतो. सतत स्ट्रेसमध्ये राहिल्यास एंग्जायटी आणि डिप्रेशनचा धोका वाढतो. याशिवाय मेंदूच्या स्मरणशक्तीशी संबंधित भागावरही परिणाम होतो. त्यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतात आणि स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, डोकेदुखी, झोप न लागणे, सतत थकवा जाणवणे किंवा चिडचिड होणे ही शरीरातील ताणाची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार, ध्यानधारणा आणि सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घेणं उपयुक्त ठरू शकतं. गरज वाटल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.