मुंबई: विना अनुदानित शिक्षकांनी कामाप्रमाणे सामान पगार देण्यात यावा या मागण्यांसाठी मुंबई मधील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला असून त्यामध्ये अनेक शिक्षक जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मोर्चात मोठ्यासंख्येने शिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरवात केली. त्यामुळे एकाच गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांनी या शिक्षकांवर लाठीमार केल्याची माहिती समोर येत आहे. अचानक लाठीमार झाल्याने आंदोलन पार्ट्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता त्यामुळे सर्वांची धावपळ झाली. दरम्यान या लाठीमारात १० पेक्षा अधिक शिक्षक जखमी झाल्याची ही माहिती समजत आहे.
आंदोलनात गोधळ झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसउपायुक्तांनी घटनास्थळी जाऊन आंदोलन कर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलन कर्त्यांमधील पाच जणांचे शिष्ट मंडळ शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना भेटण्यासाठी गेले आहे. आमच्या प्रश्नावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असून जर मागण्या मान्य नाही झाल्या तर सामूहिक आत्मदहन करणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.