लंडन – आधुनिक जगात स्पर्धात्मक वातावरणामुळे आणि नोकरी व्यवसायातील ताणतणावामुळे अनेकांना पुरेशी झोप घेता येत नाही आपले आरोग्य राखण्यासाठी माणसाने किमान आठ तास झोप घ्यावी असे आरोग्यशास्त्र सांगत असले तरी अनेकांना तेवढी पुरेशी झोप मिळत नाही पण आता एनएस डीआर तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही कमी कालावधीत झोपला तरी तुम्हाला पूर्णपणे ताजेतवाने वाटू शकते गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीसुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला असून आपल्याला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एन एस डी आर याचा अर्थ नॉन स्लिप डीप रेस्ट म्हणजेच प्रत्यक्ष न झोपता फक्त डोळे मिटून काही कालावधीसाठी पडून राहणे असा प्रयोग केल्यामुळे तुम्हाला 8तास झोप घेतल्यामुळे जेवढी विश्रांती मिळते तेवढीच विश्रांती एनएसडीआर तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे माणसाला मिळू शकते भारतात महाभारत कालापासून एन एस डी आर तंत्रज्ञान वापरण्यात येत असून त्यालाच आपल्या सांस्कृतिक भाषेमध्ये योगनिद्रा असे म्हणतो.
अर्जुन भारतातील एक महत्त्वाचे पात्र असून त्याला कधीही झोपेची गरज भासली नाही पण जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा तो या तंत्रज्ञानाचा म्हणजेच योग्य निद्रेचा वापर करून विश्रांती घेत असे ज्या व्यक्तीला पुरेशा प्रमाणात झोप घेणे शक्य नाही अशा व्यक्तीने दहा मिनिटे ते तीस मिनिटांच्या कालावधीमध्ये डोळे बंद करून तो पडून राहिला तरी आठ तास झोपेनंतर जेवढी विश्रांती मिळते तेवढि विश्रांती या दहा ते तीस मिनिटांच्या कालावधीत मिळू शकते सुंदर पीचाई यांनी वॉल स्ट्रीटला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या तंत्रज्ञानाचे महत्त्व जगासमोर आणले जेव्हा जेव्हा मला विश्रांतीची गरज असते तेव्हा मी योग्य निद्रेचा आश्रय घेतो असे त्यांनी म्हटले आहे.
स्टॅनफर्ड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉक्टर अँड्र्यू हुबर्सन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ते गेले दहा वर्षे या तंत्रज्ञानाचा वापर करत असून त्यांना केव्हाही थकल्यासारखे वाटत नाही किंवा पूर्ण झोप झाल्याची भावना त्यांच्या मनात नेहमीच असते डोळे बंद करून पडल्यावर हळूहळू आपला मेंदू शांत होतो आणि मेंदू शांत झाल्यावर हृदयाची गती सुद्धा कमी होते.
त्यामुळे आपोआपच विश्रांती मिळाल्याची भावना निर्माण होते भारतामध्ये गेले हजारो वर्षे हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. भारतीय संस्कृतीतील ऋग्वेद या ग्रंथात योगनिद्रा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली असून मंद प्रकाशात ही योगनिद्रा घ्यावी असे त्यात सुचवण्यात आले आहे. माणसाला जे विविध विकार होतात त्यापैकी 75 टक्के रोग मानसिक ताण तणाव होत असल्याने या योगनिद्रेच्या तंत्राचा वापर करून माणसाला आरोग्यपूर्ण जीवन मिळवणे शक्य होणार आहे असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे.