Sports Ministry on IND vs PAK : भारतीय क्रीडा मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय क्रीडा संबंधांवर गेल्या वर्षी घातलेली पूर्ण बंदी यापुढेही कायम राहणार आहे. मात्र, सीमा पार करून येणाऱ्या खेळाडूंना बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येण्यापासून रोखले जाणार नाही. भारताला एक ‘पसंदीदा क्रीडा स्थळ’ म्हणून जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यासाठी क्रीडा, अधिकारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्याची ग्वाहीही मंत्रालयाने दिली आहे. भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही – मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOA), भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (NSF) जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रीडा स्पर्धांवर बंदी असेल. भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही आणि पाकिस्तानी संघांनाही भारतात खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. परंतु, बहुराष्ट्रीय किंवा जागतिक स्पर्धांच्या बाबतीत मात्र वेगळे धोरण असेल. जर एखादी स्पर्धा भारतात किंवा अन्य तटस्थ ठिकाणी होत असेल, तर भारतीय संघ आणि खेळाडू त्यात सहभागी होऊ शकतील. तसेच, पाकिस्तानी खेळाडू किंवा संघही भारतात आयोजित अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतील. The Sports Ministry: Indian teams will not be participating in competitions in Pakistan. Nor will we permit Pakistani teams to play in India. With regard to international and multilateral events, in India or abroad, we are guided by the practices of international sports bodies… pic.twitter.com/DptfcYugvv — IANS (@ians_india) May 6, 2026 गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाली होती घोषणा – या धोरणाची घोषणा सर्वप्रथम गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये करण्यात आली होती. युएईमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताच्या सहभागावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. भारताचे हे धोरण ऑलिम्पिक चार्टर आणि सर्वसमावेशकतेच्या भावनेशी सुसंगत आहे. यामुळेच भारत २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या यजमानपदासाठी इच्छुक आहे. हेही वाचा – Sanju Samson Record : संजू सॅमसनने आयपीएल कारकीर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी; या बाबतीतही पटकावले अव्वल स्थान व्हिसा प्रक्रियेत सुलभता – भारताला जागतिक क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनवण्यासाठी व्हिसा प्रक्रिया अधिक सोपी केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळाच्या आधारे ५ वर्षांपर्यंतचा बहु-प्रवेश व्हिसा (मल्टीपल एंट्री व्हिसा) प्राधान्याने दिला जाईल. दरम्यान, युवा मामले आणि क्रीडा मंत्रालयाने आपले कार्यालय शास्त्री भवन येथून नेताजी नगर येथील नवीन संकुलात स्थलांतरित केले आहे.