मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.
जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दरम्यान, याच मालिकेतील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लेखक अभिषेक मकवाना असं त्यांचं नाव आहे. अभिषेक यांनी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, अभिषेकच्या कुटूंबियांना सायबर फ्रॉड आणि ब्लॅकमेलला अभिषेक बळी पडल्याचा संशय व्यक्त केला आहे. अभिषेक च्या आत्महत्येने या कार्यक्रमाच्या सर्व टिमला जबरदस्त झटका बसला आहे.
27 नोव्हेंबरला अभिषेक यांचा मृतदेह मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोट मध्ये आर्थिक अडचणीमुळे आपण ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या भावाने जेनीस सांगितले की, अभिषेकच्या मृत्यूनंतर त्याला आर्थिक अडचण असल्याची माहिती समोर आली. त्यांनी अभिषेकचे फोन उचलणे सुरु केले तेव्हा त्यांना या घटनेबाबत कळाले.