सासवड (पुणे) – वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सासवड शहरात बुधवार (दि. 16) ते मंगळवार (दि. 22) या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
नगरपालिकेत शनिवारी (दि. 12) व्यापारी व नगरपालिकेचे प्रमुख यांची बैठक झाली, त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विनोद जळक, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी उपनगराध्यक्ष यशवंतराव जगताप, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण, उमेश जगताप यांसह व्यापारी उपस्थित होते.
संजय चव्हाण म्हणाले की, दोन आठवड्यांपासून पुरंदर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असून एकूण संख्या 1800 वर तर मृत्यूचा आकडा 65 वर गेला आहे. तालुक्यातील 82 गावांना संसर्ग झाला असून सासवड शहरातील बाधितांची संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यात काही व्यापाऱ्यांचेही निधन झाले असून अनेकांना संसर्ग झाला आहे. नागरिकांकडू नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आल्याने ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी नमूद केले.