Smriti Irani | Rahul Gandhi | Lok Sabha Election 2024 – या देशात अशी काही राज्ये आहेत जिथे ‘जय श्री राम’ म्हणत असलेल्या लोकांना इंडिया आघाडीच्या भागीदारांनी ठार मारले होते. आज आपण इथे भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उभे आहोत हे आपले सर्वात मोठे भाग्य आहे.
आमच्या पक्षाने राम मंदिराची तारीख सांगितली, मंदिर बांधले आणि प्रभू रामाचा महिमा पहा की, ज्यांनी त्यांचे अस्तित्व नाकारले, त्यांनाही प्रभू रामाने बोलावले, अशा शब्दांत
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी काॅंग्रेससह इंडिया आघाडीच्या दक्षिणेतील नेत्यांवर टीका केली.
चेन्नईच्या वेपेरी जिल्ह्यातील वायएमसीए सभागृहात मध्य चेन्नईचे भाजप उमेदवार विनोज पी सेल्वम यांच्या समर्थनार्थ प्रचार सभेत इराणी बोलत होत्या.
स्मृती इराणी म्हणाल्या की, माझा आवाज राहुल गांधींपर्यंत पोहोचला तर मी त्यांना सांगू इच्छिते की, तुमच्यासारखे अनेक लोक आले आणि अनेक गेले, हिंदुस्थान आहे, होता आणि तसाच राहील.
अजमेरमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदींनी विचारले होते की, राम मंदिर बनले आहे, तुम्ही खुश आहात की नाही? प्राणप्रतिष्ठेला जाण्यास काँग्रेसचा विरोध योग्य होता का? एवढंच नाही तर कुणी प्राणप्रतिष्ठेत गेले तर त्यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली.
प्रभू रामाशिवाय या देशाची तुम्ही कल्पना करू शकता का? इराणी यांनीही मोदींच्या अजमेर सभेतील वक्तव्यांचा आधार घेतला. पहिल्या टप्प्यात तामिळनाडूच्या सर्व ३९ लोकसभा आणि पुद्दुचेरीच्या एकमेव जागेसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.