नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने मेक ईन इंडियाचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र चीनकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरूच ठेवली असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
आपल्या मागणीच्या पुष्ट्यर्थ त्यांनी मोदी सरकारच्या कालावधीत चीनकडून किती मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली याचा आलेखच सादर केला आहे. यूपीए सरकारच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात चीनकडून मोठ्या प्रमाणात आयात केली गेली असल्याचे त्यांनी यात दर्शवले आहे.
राहुल गांधी यांनी मोदी सरकारची मेक ईन इंडिया ही योजना अपयशी ठरल्याचा आरोप अनेक वेळा केला आहे. चीन बरोबरच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात चीनकडून मोठ्या प्रमाणात जी आयात केली आहे त्याचा उल्लेख करीत प्रथमच अशा स्वरूपाची टीका करीत आहे.