मुंबई – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे.दोन्ही देशांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांचे असंख्य किस्से देखील आहेत. असाच एक किस्सा भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तरबद्दल शेअर केला आहे. वीरूने सांगितले की, पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाने अशी चूक केली होती की सचिनच्या पाया पडून त्याला माफी मागावी लागली.
एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना वीरेंद्र सेहवागने सचिन-शोएब बाबतचा किस्सा शेअर केला. सेहवागने सांगितले की, भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या पार्टीत शोएबने सचिनला खांद्यावर उचलून घेण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान तो सचिनला सांभाळू शकला नाही. यानंतर सेहवागने शोएबची चांगलीच टर उडवायला सुरुवात केली.
वीरू म्हणाला, “लखनऊमध्ये भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी एक पार्टी होती, शोएब अख्तरने एक ते दोन पेग घेतले होते आणि सचिनला उचलण्याचा प्रयत्न करत होता. तेंडुलकर कदाचित त्याच्यासाठी खूप भारी होता आणि तो त्यांना घेऊन पडला. यानंतर मी शोएबची अनेकदा फिरकी घ्यायचो असं सेहवाग सांगतो. मी म्हणायचे की तुझं करिअर संपलं. तू आमच्या अव्वल खेळाडूला पाडलं आहेस. माझ्या बोलण्याने शोएब खूप घाबरला आणि तो सचिनला दिसेल तिथे सॉरी म्हणत होता. असा खुलासा सेहवागने केला आहे.
सेहवागने पुढे म्हणतो की, शोएब सचिनच्या पाया पडून माफी मागायचा. वीरूच्या म्हणण्यानुसार, सचिन आपल्या वागणुकीबद्दल बीसीसीआयकडे तक्रार करेल असे सांगून तो पाकिस्तानच्या शोएब अख्तरला घाबरवायचा.तसेच जेव्हा तो सचिनला भेटतो तेव्हा हा किस्सा नक्की आठवतो असंही विरून यावेळी सांगितले.