MP Sanjay Raut : शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. याच निर्णयावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यावर आजपासून सुनावणी होत आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने चार महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात नियम पाळले जाण्याची टिप्पणी केली होती. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
याविषयी बोलताना संजय राऊत (mp sanjay raut) यांनी, “न्यायालयात आज काय होणार यावर मी बोलणार नाही. पण सत्य, न्याय याचा विजय होईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहेत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात.. विधिमंडळातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही हे स्पष्ट केल्यामुळे चिन्ह व नाव याबाबत कोणताही संभ्रम असण्याचं कारण नाही. विधिमंडळातले आमदार किंवा संसदेतले खासदार सोडून केले म्हणजे पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाहीत असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे शिवसेना एकसंघ आहे, एकसंघ राहील”, असे संजय राऊत (mp sanjay raut) यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, यावेळी एका मध्यमप्रतिनिधीने ‘ठाकरे गट’ असा उल्लेख करून संजय राऊतांना प्रश्न विचारताच राऊतांनी ‘ठाकरे गट नाही, शिवसेना’ असे ठामपणे सांगितले. राहुल नार्वेकरांसमोर आमदार अपात्रतेची सुनावणी चालू असल्याबाबत विचारणा केली असता वेळकाढूपणा चालल्याचा आरोप देखील राऊत (mp sanjay raut) यांनी यावेळी केला.
तसेच “वेळकाढूपणा चालला आहे. संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम याच्याशी केलेली बेईमानी आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार चालवलं जातंय. सहा महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही सुनावणी घेतली जात नाही. त्यामुळे घटनाबाह्य सरकारला घटनात्मक पदावर बसलेले विधानसभेचे अध्यक्ष चालवतायत का? की चालवू देतायत? हा प्रश्न आहे”, असेही संजय राऊत यांनी (mp sanjay raut) यावेळी म्हटले.