‘ती आमच्या मुलाचे सामान आणि कीर्ती चक्र घेऊन तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली…’ शहीद अंशुमन सिंहच्या आई-वडिलांनी सुनेवर केले हे आरोप

Martyr Captain Anshuman Singh । 5 जुलै रोजी सियाचीनमध्ये आपल्या साथीदारांना वाचवताना शहीद झालेल्या कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या साहस आणि शौर्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. मात्र आता अंशुमन सिंगच्या पालकांची आणखी एक व्यथा समोर आली आहे. अंशुमन सिंगच्या पालकांनी सैनिकाच्या मृत्यूच्या बाबतीत कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत देण्यासाठी बनवलेल्या कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ‘त्यांची सून स्मृती यांनी त्यांचे घर सोडले आहे, आणि आता त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना बहुतांश अधिकार मिळत आहे. अंशुमनची पत्नी आता आमच्यासोबत राहत नाही. त्यांच्या लग्नाला केवळ पाच महिने झाले असून त्यांना मूलबाळ नाही. भिंतीवर टांगलेला त्याच्या मुलाचा फोटो फक्त बाकी आहे, असेही त्यांच्या कुटूंबाने सांगितले आहे.
Martyr Captain Anshuman Singh । शहीद अंशुमन सिंह यांची आई मंजू सिंह म्हणाल्या…
‘सून पळून जातात. पालकांचा आदर केला पाहिजे. आम्ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांना विनंती केली की, सैन्यात शहीद झालेल्या तरुणांच्या कुटुंबात सून व्यतिरिक्त आई-वडिलांचीही काळजी घेतली जावी. मंजू सिंग म्हणाले की, ते धोरण बदलण्याची मागणी करत आहे. कारण त्यांच्यासारख्या इतर पालकांनाही अशाच समस्येचा सामना करावा लागू नये अशी त्यांची इच्छा आहे.’
Martyr Captain Anshuman Singh । या प्रकरणी स्मृती सिंह काय म्हणाल्या…
शहीद अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह यांना काही पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, मला याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. त्यांना जे वाटेल ते त्यांनी सांगितले. यावर माझा आक्षेप नाही. सध्या मी बाहेर आले आहे. शहीद अंशुमनची पत्नी स्मृती व्यवसायाने इंजिनिअर असून तिचे आई-वडील शाळेचे मुख्याध्यापक आहे. स्मृतीचे वडील राजेश सैनी यांनीही याप्रकरणी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
Martyr Captain Anshuman Singh । NOK म्हणजे काय?
जर आपण NOK बद्दल बोललो तर याचा अर्थ नेक्स्ट टू किन असा होतो. जेव्हा कोणतीही व्यक्ती सैन्यात भरती होते, तेव्हा त्याच्या पालकांचे किंवा पालकाचे नाव नातेवाईक म्हणून नोंदवले जाते. म्हणजे तो त्या व्यक्तीचा सर्वात जवळचा नातेवाईक असतो. जेव्हा कॅडेट विवाह करतो तेव्हा पती / पत्नी NOK रेकॉर्डमध्ये त्याच्या पालकांची जागा घेतात.





