नवी दिल्ली – एक वेळ अशी येते की जेव्हा युवकांना संधी देणे आवश्यक असते, असं मला वाटते. पण राजकारणात असेही म्हटले जाते की, कधीही नको म्हणू नका. मी जर निवडणूक लढवत असेन तर शेवटच्या निवडणुकीप्रमाणे पूर्ण ताकदीने लढवेन. मी जिंकलो तर तिरुवअनंतपुरममधील ( Tiruanantpuram ) लोकांसाठी माझी 20 वर्षांची सेवा होईल. त्यानंतर मी आनंदाने पद सोडू शकतो, असे सूचक विधान काँग्रेस नेते शशी थरूर ( Shashi Tharoor ) यांनी केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार शशी थरूर यांनी लोकसभा निवडणूक लढण्याबाबत मोठ वक्तव्य केले आहे. आगामी निवडणूक आपली शेवटची निवडणूक असणार असल्याचा त्यांनी म्हटले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे शशी थरूर यांच्या उमेदवारीवरून बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. ( Congress )
केरळमधील तिरुवअनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतानाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 2024 मध्ये होणारी निवडणूक आपली शेवटची निवडणूक असेल, असे त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. याविषयी आता त्यांनी खुलासा केला आहे.
2014 पासून मोदी लाटेत थरूर यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यामुळे यावेळीही त्यांची उमेदवारी पक्की असल्याचे मानले जात आहे. पण त्यांनी केलेल्या वक्तत्यामुळे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.