माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीबाबत शरद पवारांचे महत्वाचे विधान: अत्यंत मोजक्याच शब्दांत काय केले भाष्य? पाहा….

Sharad Pawar | Baramati | बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या २२ जूनला निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणर असून २४ जूनला निकाला लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. तसेच शरद पवार यांच्या पॅनेलचे देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच बारामतीत शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
ही निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे शरद पवार म्हणाले आहेत. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित करत हा स्थानिक प्रश्न आहे. याचा अर्थ, ही निवडणूक फक्त स्थानिक पातळीवरची आहे. याकडे राज्याने लक्ष देण्याची गरज नाही. असे भाष्य शरद पवार यांनी केले आहे.
तसेच आजूबाजूला जे तालुके आहेत त्यांचे लक्ष इथे नाही, असे देखील पवार म्हणाले. बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता. परंतु, आता कापूस इथे राहिला नाही. म्हणजेच पूर्वी बारामती कापसासाठी ओळखली जात होती, असे बारामतीत सूतगिरणी का झाली नाही यावर बोलताना शरद पवार म्हणाले. नुकतेच महाराष्ट्र सरकाने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत शरद पवार यांनी स्वागत केले असून, AI तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे हित साधले जाईल, असे त्यांनी सांगितले.
फडणवीसांचे मानले आभार
नुकतेच महाराष्ट्र सरकारने १० महत्वाचे निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतले. यामध्ये कृषी क्षेत्रातील निर्णयांचा देखील समावेश आहे. यावर देखील शरद पवार यांनी भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. महाराष्ट्र सरकारने काल 500 कोटीचा निर्णय घेतला आहे. ऊस आणि बाकीचे पिके वापरण्याचे धोरण फायनल केले. हा फायद्याचे असेल म्हणून निर्णय घेतला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन शरद पवार यांनी केले. त्यांनी निर्णय करण्याचे धाडस दाखवले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे शरद पवार म्हणाले.





