मुंबई – देशात एकीकडे करोनाचा गोंधळ सुरु असतानाच दुसरीकडे तबलीगीसारखी घटना घडली आहे. त्यामुळे अख्खा देश ढवळून निघाला आहे. दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मरकजच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले कि, दिल्लीत आयोजित करण्यात आलेला मरकजा कार्यक्रम टाळायला हवा होता. त्यामुळे देशात परिणाम होऊ शकतात. सामूहिकपणे येणं टाळायला हवं. मुस्लिम लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, दिल्ली येथे मरकजमध्ये मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत बनल्याचे बोलले जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निजामुद्दीच्या मरकजमध्ये सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु, या आदेशाचे उल्लंघन करत कार्यक्रमाचे आयोजन झाले.