Devendra Fadnavis : येत्या 23 एप्रिलला बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थिती होईल. यापूर्वीही महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केल्या आहेत, असे विधान फडणवीसांनी केलं आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मला आठवते की जेव्हा आर. आर. पाटील यांचे निधन झाले होते. त्याही वेळेस ती पोटनिवडणूक भाजप आणि आम्ही ठरवले होते की लढणार नाही आणि ती निवडणूक बिनविरोध पार पडली होती. मला वाटते सर्वच पक्षांनी मन मोठे करून निवडणूक बिनविरोध केली पाहिजे, असे आवाहन फडणीसांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या आवाहानाला राजकीय पक्ष कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी हे विधान केले आहे. बारामती आणि राहुरी या दोन विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवार देणार असल्याचे निश्चित मानल जात आहे. तसे संकेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संपकाळ यांनी दिले आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उबाठा गटाची भूमिका काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरी पोटनिवडणूक दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले लढणार आहेत. या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा मानस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. नाशिकच्या घटनेवर व्यक्त केली संवदेना नाशिकमधील दिंडोरीत विहिरीत कार कोसळून अपघातात 9 जणांना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. नाशिक अपघातातील ती गाडी विहिरीत पडली, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्यावर फोनवर चर्चा केली आणि तेथील परिस्थिती देखील सांगितली. असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण कुटुंबाच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या. हेही वाचा : Toaster Trailer: ‘टोस्टर’चा ट्रेलर रिलीज: कंजुषपणामुळे अडचणीत सापडला राजकुमार राव