बिलासपूर – रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी काही विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत. या ट्रेनमधून प्रवास करताना 58 वर्षांवरील महिला, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांखालील मुलांना तिकिटात 50 टक्के सूट आहे. मात्र याचा फायदा ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांना होत नसल्याचे समोर आले आहे.
रेल्वेने अशा प्रवाशांनी प्रवास करू नये, असेच चित्र निर्माण झाले आहे. कारण तिकीट खिडकीवर अशा व्यक्तींना तिकीटच मिळत नसल्यामुळे त्यांना परत फिरावे लागत आहे. विशेष ट्रेन सुरू झाल्यानंतर सध्या आरएसी आणि कम्फर्म तिकीट असलेले प्रवाशीच या ट्रेनमधून प्रवास करीत आहेत.
स्लीपर, एसी थ्री, एसी टू आणि फर्स्ट एसी कोच शिवाय जनरल कोचमधील सिटिंग चेअरची बुकिंग आयआरसीटीसी आणि आरक्षण कार्यालयात केली जात आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांचे तिकीट आरक्षितच केले जात नाहीत.