मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील प्रार्थनास्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर खुली करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार येत्या सोमवारपासून लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून टाळेबंद असलेली प्रार्थनास्थळे सोमवारपासून (१६ तारखेपासून) पुन्हा खुली करण्यात येतील.
दरम्यान, भाजपतर्फे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. असे असले तरी, ‘हा सरकारला उशिरा सुचलेला शहाणपणा आहे.’ असा टोला विधानपरिषदेतील वीरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लगावलाय. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी, प्रवीण दरेकर यांचे वक्तव्य खोडून काढत सरकारने निर्णय योग्य वेळी घेतल्याचं म्हंटलंय.
काय म्हणाले जयंत पाटील?
याबाबत बोलताना पाटील यांनी, ‘कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना मंदिरे उघडण्याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेण्यात आलाय. प्रार्थनास्थळांबाबतचे नियम हे सर्वांसाठी समान राहणार आहेत. मास्क, सॅनिटायझर यांचा वापर अनिवार्य असेल. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळणे महत्वाचे आहे.’ असं वक्तव्य केलं.
The decision has come at the right time when the number of corona patients is low. The rules will be the same for all the religious places. The use of masks, sanitizers would be mandatory. Social distancing is very important: Jayant Patil, Maharashtra minister https://t.co/frUuX2jVlI pic.twitter.com/z2KaflivCf
— ANI (@ANI) November 14, 2020
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
“उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचलं. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांची जी मागणी होती. हिंदुत्व प्रेमी जनतेची मागणी होती. किंबहुना मंदिरावर असणाऱ्या व्यावसायिकांची मागणी होती. त्यांचा रेटा दबावाने या ठिकाणी शासनाला निर्णय घ्याव लागला. उशीरा का होईना, घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो.”
खरंतर हा निर्णय अगोदरच व्हायल हवा होता. कारण, जर मंडई, लॉन्स, अगदी रेस्टॉरंट-बार, जिम व इतर सार्वजिनक गर्दीची स्थळं मोकळी केलेली असतील. तर वारकरी संप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने ही भूमिका मांडलेली असताना मला वाटतं हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. वारकरी संप्रदायाच्या मागे हिंदुत्वाच्या भावनेतून भाजपा आहे. परंतु, प्रतिष्ठा व अहंकारापोटी हा निर्णय होत नव्हता. मात्र उशीरा का होईना एक दिलासा या सरकारने दिलेला आहे. याचं मी स्वागत करतो” असं दरेकर म्हणाले.
मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत; परंतु राज्य सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण. @CMOMaharashtra pic.twitter.com/2sVQe2KrRa
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 14, 2020