मुंबई – भाजपचे नेते आणि मंत्री नितिन गडकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरात भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदे सध्या राज्यात आणि केंद्रात चालू असल्यालेला वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील शेतीच्या प्रश्नांवर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून चाललेल्या राजकारणावर महत्वपूर्ण भाष्य केले आहे. पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘राज्यातील आणि देशातील अनेक महत्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत. त्याविषयी आमच्यामध्ये चर्चा होते, आणि झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक प्रश्न आहेत, मात्र सावरकर हा राष्ट्रीय इश्शू नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.’
ते पुढे म्हणाले,’शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. मराठवाड, विदर्भ या भागात ज्या प्रकारे सोयाबीन पिकवले जाते त्याच प्रमाणे जर ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली तर त्याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना प्रचंड होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.’