Satwik Chirag withdraws from Malaysia Open : भारताची स्टार पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपनमध्ये चमकदार कामगिरी करत रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) पटकावले आहे. मात्र, या मोठ्या यशानंतर लगेचच या जोडीने आगामी ‘मलेशिया मास्टर्स’ स्पर्धेतून माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर आपल्या वर्कलोड आणि शेड्यूलचे काळजीपूर्वक नियोजन करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. अंतिम सामन्यात निसटता पराभव – थायलंड ओपनच्या सुवर्ण पदकासाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतीय जोडीला इंडोनेशियाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनियल मार्थिन यांच्याकडून १२-२१, २३-२५ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या गेममध्ये इंडोनेशियाच्या जोडीने वर्चस्व राखले, परंतु दुसऱ्या गेममध्ये सात्विक-चिरागने जबरदस्त पुनरागमन केले. त्यांनी तब्बल चार चॅम्पियनशिप पॉईंट्स वाचवले, पण अखेरच्या क्षणी अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तेथील वेगवान परिस्थितीमुळे सुरुवातीला लय सापडणे कठीण झाल्याचे चिरागने मान्य केले. सिंगापूर ओपनमधून करणार पुनरागमन – The Wait Continues…. A strong week, but the title drought continues for Satwik Rankireddy and Chirag Shetty 🇮🇳🏸 The Indian duo finished runners-up at the Thailand Open 2026 after an impressive run to the final. Route to Final: ✅ Bagas/Muhammad ✅ Goh/Izzuddin ✅… https://t.co/DnV6z8YeCO pic.twitter.com/bSBvtwAN0p — IndiaSportsHub (@IndiaSportsHub) May 17, 2026 थायलंड ओपन संपल्यानंतर सात्विकने स्पष्ट केले की, “आम्ही मलेशिया मास्टर्समध्ये खेळणार नाही आहोत. या विश्रांतीनंतर आम्ही थेट सिंगापूर, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया लेगच्या स्पर्धांमधून कोर्टवर पुनरागमन करू.” हेही वाचा – Virat Kohli Record : ३५ शी ओलांडली तरी ‘किंग’चा रुबाब कायम! सचिन तेंडुलकरला मागे टाकत विराटने IPL मध्ये रचला नवा इतिहास “आम्ही आमचा जुना आत्मविश्वास परत मिळवतोय” – गेल्या काही महिन्यांत फॉर्म आणि आत्मविश्वास खालावला असल्याची प्रांजळ कबुली सात्विकने दिली. मात्र, या आठवड्यातील खेळामुळे समाधान व्यक्त करताना तो म्हणाला, “गेल्या वर्षाच्या तुलनेत कोर्टवर आमचा आत्मविश्वास कमी झाला होता, पण आता तो ९० टक्क्यांपर्यंत परत येत आहे. हा खेळ शारीरिकतेपेक्षा मानसिक जास्त आहे आणि आता परिस्थिती आमच्या बाजूने बदलू लागली आहे.” चिरागनेही याला दुजोरा दिला आणि ‘थॉमस कप’ मोहिमेमुळे त्यांना आपल्या खेळावर पुन्हा विश्वास ठेवण्यास मोठी मदत झाल्याचे सांगितले.