पुसेगाव : (प्रकाश राजेघाटगे) – बुध ता. खटाव येथे आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा प्रथम वर्धापन सोहळा श्री स्वामी समर्थ्याच्या जयघोषात उत्साहात साजरा करण्यात आला .यानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचा बुधमध्ये आरती चालू होऊन १वर्ष पूर्ण झाले आहे . त्यानिमित्त प्रथम वर्धापन दिन मोठ्या संख्यांमध्ये सेविकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्यानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या आगमन सकाळी झाल्यानंतर दर्शनासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती. पादुकांचे विधीवत पुजन करून अभिषेक करण्यात आला.भूपाली आरती करून चरित्रसारामृत पाठ वाचन करण्यात आले. त्यानंतर महानैवदय आरती झाली. श्री स्वामी समर्थ ११ माळी नामस्मण करण्यात आले. Satara News पालखीमध्ये पादुका विधीवत ठेवण्यात आल्या.रथामध्ये श्री स्वामी समर्थाचे अधिस्टाण ठेवण्यात आले. पालखी व रथाच्या भव्य मिरवणुकीने श्री स्वामी समर्थांच्या घोषात, लेझीम, तुतारी, टाळाच्या गजरात भक्तिफ्प आणि उत्साही वातावरणात झाली. जोतीबा मंदिरापासून मिरवणुकीला सुरूवात झाली. भाविक आणि ग्रामस्थांनी जागोजागी पालखी व पादुकांचे दर्शन घेत श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या घोषणा दिल्या. मंदिरापासुन निघालेल्या मिरवणुकीत खटाव व मण तालुक्यातील सेवेकरी, लेझीम पथक,डिजे, तुळशी घेतलेल्या महिला सेवेकरी, पताके,टाळ घेतलेल्या महिला , आकर्षक पोखाख परिधान केलेले पुरूष व महिला सेवेकरी लक्षवेधक ठरल्या. महिला व पुरूषांनी चौका चौकात उभे रिंगण केले व जागोजागी फुगडया खेळल्या. पादुका प्रदक्षिणा व स्वामींची रथ यात्रा संपूर्ण गावातून झाल्यानंतर विविध पादुका व श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिस्टान मंदिरात आणले. त्यानंतर मंदिरामध्ये आरती करण्यात आली.