नवी दिल्ली : भारताचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. तामिळनाडूत लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. या भीषण दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील १४ जणांचा मृत्यू झाला.
देश के सर्वोच्च सेनापति की सबसे अत्याधुनिक हेलीकॉप्टर में मृत्यु हो जाती है,
इससे लोगों के मन में कुछ शंकाए पैदा होती है, ऐसा कैसे हो सकता है ? : शिवसेना सांसद @rautsanjay61 जी… pic.twitter.com/U8BZ8hwZ1V
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) December 9, 2021
या भीषण दुर्घटनेवर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह , काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले,’संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या अपघाती निधनामुळे देशावर शोककळा पसरली आहे. रावत यांच्या निधनामुळे देशातील नागरिकांच्या मनात घातपाताचा संशय निर्माण झाला आहे. तशीच शंका देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात निर्माण झाली असेल. केंद्र सरकारही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले,’ मला खात्री आहे की काल देशाचे सर्वोच्च नेतृत्व सुद्धा गोंधळले असेल. या घटनेमुळे त्यांच्या मनात सुद्धा काही शंका निर्माण झाल्या असतील. अनेक कार्यक्रमांमध्ये बिपिन रावत हे त्यांचा लष्करी रुबाब बाजूला ठेवून आमच्यासोबत संवाद साधत असत. ,” असे संजय राऊत म्हणाले.