sanjay raut – आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी भरत गोगावले यांना सूरतला जाणं हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता का? असा प्रश्न विचारला यावर भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज सूरतला गेले म्हणून मीही गेलो होतो असे उत्तर दिले. दरम्यान यावर आता संजय राऊत यांनी यांनी दिली आहे. गद्दारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये असं राऊत म्हणाले आहे.
संजय राऊत म्हणाले,’भरत गोगावलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सूरतला गेले होते ते ब्रिटिशांना आणि ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळांच्या वखारी लुटण्यासाठी गेले होते.
ते पुढे म्हणाले,’तुम्ही तर महाराष्ट्र लुटण्यासाठी तिकडे गेलात.शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या, ते काही सूरतवरुन रेडे कापायला गुवाहाटीला गेले नव्हते. गद्दारी आणि बंड यात फरक असतो. गद्दारांनी शिवाजी महाराजांशी तुलना करु नये. जे खरे बंडखोर असतात त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं असेही राऊत यांनी म्हटलं आहे.