मुंबई – अपक्षांवर विश्वास नसेल तर विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानावेळी संजय राऊत यांना माझ्यासोबत पाठवावे. मी त्यांना मतपत्रिका दाखवून नंतर मतपेटीत टाकेन, असे वक्तव्य मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले होते. देवेंद्र भुयार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता आमचा त्यांच्यावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी संजय राऊत यांनी विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या गोटातील आमदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांचे आमदार फोडतील, असेही बोलले जात आहे. मात्र, संजय राऊत यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले.
असे काहीही नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अपक्ष आमदारांशी संपर्क साधला जात आहे. निवडणुकीच्या काळात सगळे एकमेकांशी चर्चा करतच असतात. शेवटी महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री सगळ्यांना एकत्र बसवून निर्णय घेतील, असे राऊत यांनी म्हटले