Sanjay Raut on Manoj Jarange। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या कालच्या आक्रमक पावित्र्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येताना दिसून येतायेत. त्यातच आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्यावर प्रतिक्रिया दिलीय. मात्र प्रतिक्रिया देताना त्यांनी फडणवीसांवरही टीका केली.
आस सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी,”मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना बोलायला लावणारे तुमच्या आजूबाजूला बसले आहेत का?असा सवाल यावेळी त्यांनी केला.
पुढे बोलताना,”ज्यांना महाराष्ट्र अस्थिर करुन काही वेगळं राजकारण करायचं आहे. जरांगे पाटील यांच्याविषयी माहिती असेलच. त्यांचे फोन वगैरे टॅप करण्यासाठी रश्मी शुक्लांना बसवलं आहे. त्या अनुभवी आहेत या सगळ्याच्या बाबतीत. कोण कुणाशी बोलतंय, पाठिंबा देतंय हे रश्मी शुक्लांना माहीत असतं. त्यामुळे अनुभवी डी.जी. असलेल्या रश्मी शुक्लांशी चर्चा केली पाहिजे. फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का? हे फडणवीसांनी जाणून घेतलं पाहिजे” असे संजय राऊत यांनी म्हटलं.
…तर फडणवीस यांच्यासारखे दुर्दैव कोणाचेही नाही Sanjay Raut on Manoj Jarange।
तुमच्या सरकारमधले लोक काड्या लावत आहेत का? कोण जरांगेंशी बोलतं आहे हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर ते दुर्दैव आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत मला गोळ्या घातल्या जातील, एन्काऊंट केला जाईल ही मनोज जरांगेंची भाषा त्यांनी बहुदा भाजपाकडून घेतली आहे.असे म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.
त्यांच्या भाषेकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांचा भावना समजून घ्या Sanjay Raut on Manoj Jarange।
जरांगे हे साधे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भाषेकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या भावना लक्षात घ्या. तुमच्याकडे जे भाजपाचे सुशिक्षित नेते, कडक इस्त्रीचे कपडे घालणारे ते काय भाषा वापरतात ते जरा बघा. एकमेकांना संपवण्याची भाषा त्यांची आहे. या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार कुणी बिघडवला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाच्या नेत्यांनी बिघडवला आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला.