दुष्काळी माण तालुक्यातील डोंगराळ, दऱ्याखोऱ्यातील टाकेवाडी गावातील एका गरीब कुटुंबातील बाळू घोरपडे या माणदेशी युवकाने आपल्या रॉयल कारभाराच्या जोरावर गल्ली ते दिल्ली असा खडतर प्रवास यशस्वी करून दाखवला आहे. आपल्या मुलीच्या नावाने सुरू केलेल्या श्रावणी सोलर, कन्स्ट्रक्शन, ऍग्रो फूड, चॅरिटेबल ट्रस्ट, इम्पेक्स ट्रेड इंटरनॅशनलच्या माध्यमातून आज दिल्ली, राजस्थान, मुंबई, पुणे, रांजणगाव आदी ठिकाणी या समूहाचे संस्थापक व सामाजिक बांधिलकी जपणारे युवा उद्योजक संदीपशेठ घोरपडे यांनी माणदेशचा झेंडा रोवत रॉयल कारभार करून दाखवला आहे. त्यांनी माणदेशचा झेंडा गोव्यात रोवून थ्री स्टार हॉटेल व्यवसायात नुकतीच उडी घेतली आहे. अशा या रॉयल कारभाऱ्याचा आज (दि. 5 जून) 35 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त…
पैसा असेल तरच समाजात, जीवनात त्या व्यक्तीला किंमत असते, याची जाणीव संदीपशेठ यांना लहानवयातच झाली होती. त्यामुळे त्यांनी पैसा कमावण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. एकेकाळी दहा रुपयांना महाग असलेले संदीपशेठ आज कष्टाच्या जोरावर अब्जाधीश झाले आहेत. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा त्यांचा संघर्षपूर्ण जीवनप्रवास आहे. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व काम करण्याची ताकद अंगात असेल तर कोणतेही काम पूर्णत्वास जाऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या संघर्षात त्यांना खरी साथ दिली त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाताताईंनी. त्यांचा खंबीरपणा व विश्वासच आज त्यांना उत्तुंग यशाच्या शिखरावर घेऊन गेला आहे.
श्रावणी चॅरिटेबल ट्रस्ट, सोलर, कन्स्ट्रक्शन, बिल्डर्स आदी उद्योगांच्या माध्यमातून राजस्थान, दिल्ली, मुंबई, पुणे, रांजणगाव आदी ठिकाणी शेकडो युवक-युवतींच्या हातांना रोजगार मिळवून दिला आहे. आताही त्यांनी गोव्यात थ्री स्टार हॉटेल व्यवसायात झेप घेतली आहे. उद्योग, व्यवसायात गरूडझेप घेताना लहानपणी आपल्यावर जी वेळ आली, ती इतरांवर येऊ नये, यासाठी सामाजिक बांधिलकी जपत ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब, दीनदलित, भिक्षेकरू, अनाथ, अपंग विद्यार्थ्यांना अन्नदान, शालेय साहित्य वाटप, आर्थिक मदत करत अनेकांना दत्तक घेतले आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक गुणवंत खेळाडूंनाही आर्थिक मदत करताना ते दिसतात. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना मदतीचा आधार देण्याचे कामही त्यांनी केले आहे.
दिल्ली, राजस्थान, मुंबई दरबारी त्यांनी युवा उद्योजक म्हणून आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच त्यांना देश व राज्य पातळीवरील विविध संस्था, संघटना, ट्रस्ट, फौंडेशनतर्फे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अशा या कर्तृत्ववान, दातृत्ववान संदीपशेठ घोरपडे या रॉयल कारभाऱ्याचा आज 35 वा वाढदिवस. यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
माणदेशातही रोजगार उपलब्ध करणार
राजस्थान, बिकानेर येथे उभारलेल्या सोलर प्रोजेक्टचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्णत्वास जाताच आपल्या माणदेशातही संदीपशेठ व मी असाच मोठा सोलर प्रोजेक्ट उभारणार आहे. त्यामुळे आपल्या माण-खटावच्या युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे.
खडतर परिस्थितीतून मिळवला यशाचा मार्ग
घरची परिस्थिती हलाखीची. त्यातच जवळच्या लोकांनी फसवत, खोटेनाटे आरोप करत, नाहक त्रास दिला. या संघर्षात नव्या उमेदीने संकटावर मात करत संदीपशेठ यांनी यशाचा मार्ग मिळविला. चांगलं काम करताना त्यांच्या यशावर जळणारी अनेक माणस अजूनही आहेत; परंतु अशा लोकांचा विचार न करता, संदीपशेठ आपले ध्येय गाठत आहेत.
संदीपशेठच्या दातृत्वाला सलाम
आज अनेकांकडे पैसा, संपत्ती आहे. कष्टातून मिळवलेल्या पैशांमधून काही भाग इतरांसाठी खर्च करणारे लोक समाजात अगदी कमीच आढळतात; पण सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संदीपशेठ घोरपडेंचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे.सर्वसामान्य, गोरगरीब, अनाथ, भिक्षेकरू, असहाय्य लोक, शालेय विद्यार्थी, क्रीडापटूंना मदत करणे, हे त्यांचे नित्याचे काम, मग ते कुठेही असोत. रस्त्यावरून फिरणाऱ्या, रस्त्याकडेला बसणाऱ्या भिक्षेकरू, रोगी, अस्वच्छ व्यक्तींजवळ जाऊन, त्यांची विचारपूस करत त्यांना मदत करतात. प्रत्येक शनिवारी मुंबई, पुण्यात शनी मंदिर परिसरात येणाऱ्या अनाथ, भिक्षेकरूंना कपडे, धान्य व आर्थिक मदत करतात. खरंच या दातृत्वाला सलामच करायला हवा.
सामाजिक कार्यातून उभारली माणुसकीची भिंत
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात रोजगार, उद्योग, व्यवसाय बंद झाले. त्यात हातावर पोट असलेल्या माणसांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला. शेतकरी वर्ग, गोरगरीब, मजूर, गरजू कुटुंबांना याची सर्वात मोठी झळ बसली. रोजगार गेल्याने गरजू, गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्रावणी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या प्रसंगात औंध, टाकेवाडी, शिंगणापूर, येळेवाडी, पुणे, मुंबई आदी ठिकाणच्या शेकडो गरजू कुटुंबांबरोबर अनाथ, परप्रांतीय, भिक्षेकरूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत करत युवा उद्योजक संदीपशेठ घोरपडे यांनी माणुसकीची भिंत उभारली.
शब्दांकन
– धनाजीराव सावंत, संस्थापक, स्मिता ऍण्ड श्रावणी ग्रुप ऑफ कंपनीज्
– कार्याध्यक्ष –
महाराष्ट्र रंग कामगार सेना