मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रकरणी वाद सुरु झाल्यानंतर बेळगावत वाहनांवर झालेल्या दगडफेकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चागंलीच जुंपली आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवार यांनी थेट बेळगाव गाठलं आहे.
यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक मुद्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. रोहित पत्रकरांशी बोलतांना म्हणाले, ‘मी बेळगावला जाऊ शकतो, तर सीमा समन्वयक मंत्री का जाऊ शकत नाहीत? ते पुढे म्हणाले, आमचे नेते 19 तारखेला जो आदेश देतील तो पाळला जाईल, ज्या कोणत्या नेत्याला बेळगावला जाण्यास सांगतात त्याचे पालन करतील, असेही नमूद केले.
पुढे रोहित पवार यांना राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले, ‘मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन आहे. मात्र, आता ते कुठेतरी भाजपचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी आता स्वतःची ओरिजनल स्टाईल कायम ठेवावी. भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल, तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा? राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात.’ अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला.